आपला जिल्हा

तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील शेतकरी धडकले तहसीलवर.

तहसीलदारांना दिले निवेदन.

तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील शेतकरी धडकले तहसीलवर.
तहसीलदारांना दिले निवेदन.


तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील शेतकरी आपल्या विविध मांगण्यासाठी तेल्हारा तहसीलवर मोर्चासह धडकले. तेथे जाऊन तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन दिले.

दि. २४ जूनपासून जस्तगाव येथे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. मात्र अतिष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेत पूर्णपणे पाण्याने खरडून गेलेत. तसेच काही नामांकित कंपन्यांचे बियाणे निघालेच नाही, आधीच शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन बियाणे आणले होते. मात्र, ते बियाणे निघालेच नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्याचे शेत निघाले होते ते अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरडून गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. आधीच्या पेरणीसाठी पदरमोड करून, व जमवलेली रक्कम गेली आता पुन्हा हे संकट अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाण्यासाठी कुठून पैसा आणावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा व लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

तसेच जे बियाणे निघाले नाही अशा कंपनी बियाण्याचे नमुने घेऊन चौकशी करावी, पाण्यामुळे खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी जस्तगाव येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!